केंद्र सरकारने गॅस सिलेंडर दरात ₹५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ ८ एप्रिलपासून (मंगळवार) रात्री १२ पासून लागू होणार आहे.पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) गरीब महिलांना स्वच्छ स्वयंपाक इंधन म्हणजेच LPG मिळावे म्हणून त्यांना मोफत गॅस कनेक्शन दिले जातात. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील गरीब महिलांना दिला जातो. आता, नवीन किमतींनुसार, उज्ज्वला योजना आणि इतर ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी ५० रुपये जास्त द्यावे लागतील. या दरवाढीचा प्रभाव उज्ज्वला योजनेतील लाभार्थी आणि इतर सर्व ग्राहकांवर होणार आहे.
दरवाढ
उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी: ₹५०० वरून ₹५५०
सर्वसाधारण ग्राहकांसाठी: ₹८०३ वरून ₹८५३
मागील काही दरबदलांचा आढावा:
मार्च २०२४: ₹१०० रुपयांची कपात
ऑगस्ट २०२३: ₹२०० रुपयांची कपात
त्यावेळी घरगुती गॅसचा दर ₹११०३ वरून थेट ₹९०३ पर्यंत खाली आला होता.
“दाळी, तेलं, भाजीपाला आधीच महाग झालेत… आता गॅसही वाढलाय. पगार तर तसाच आहे, पण खर्च मात्र रोज वाढतोय. घर चालवणं खरंच दिवसेंदिवस कठीण होत चाललंय!”
— निर्मला जकाते, सामान्य गृहिणी
पेट्रोल आणि डिझेलही महाग?
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने, सरकारने देशांतर्गत उत्पादन शुल्कात वाढ करत प्रति लिटर ₹2 चा भार टाकला आहे. याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही होऊ शकतो.
आता हे पाहणे महत्वाचे ठरते कि, देशातील तेल कंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत की सध्याच्या दराने लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरू ठेवला आहे.
तुमचं ह्या दरवाढीबद्दल काय मत आहे कंमेंट करून नक्की कळवा .