(“विठ्ठला, तू ही थकला असता रे…” – ही कविता केवळ भक्तीचा गजर नाही, तर शेतकऱ्याच्या श्रमांचा आक्रोश आहे.पंढरीच्या वारीत विठोबासाठी झिजणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच, आपलं शेत पिकवण्यासाठी झगडणाऱ्या बळीराजाचंही एक वेगळं पंढरपूर असतं – त्याचं शेत!

भक्तीच्या हाकेला प्रतिसाद देणारा विठोबा शेतकऱ्याच्या घामात ओलावा का आणत नाही? निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेल्या बळीराजाची व्यथा, त्याची तळमळ आणि विठोबाशी तो साधत असलेला संवाद हृदयाला भिडणारा आहे.)

विठ्ठला तू ही थकला असता रे,
करून वाऱ्या पंढरीच्या
पण तुझा भोळा वारकरी नाही थकला
घालून फेऱ्या तुझ्या गाभाऱ्याच्या

विठ्ठला एक काम कर नको घालू वाऱ्या पंढरीच्या
कधीतरी सहज पंढरीतून पाय मोकळे करायला
माझ्या बापाच्या शेतात येत जा,
माऊली माऊली ,विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर ऐकून
खुश होत जा
कारण माझ्या बापाचे शेतात राबतानाचे हाल पाहवणार
नाही तुला
सगळे म्हणतात एकादशी ला पाऊस पडतो
विठ्ठल बरसतो
पण विठ्ठला तू ही इतका स्वार्थी असशील वाटलं नव्हतं ,

जर आम्ही उपवास करून बरसणार असशील ना तू ,
तर रोजच बरसाव लागलं तुला

काळ्या रंगाच ,काळ्या मातीशी असलेले नात
तुला युगेनयुगे जपावच लागेल तुझ्या स्वार्थासाठी
नाहीतर अठ्ठावीस युग अशीच घालवावी लागतील तुला वारीविना
हा हवतर सौदा समज माझ्या बापाच्या आयुष्याचा,
भोळा वारकरी म्हणून खूप लुटलं आजपर्यंत
आता व्यवहार होणार तू बरसायच आम्ही विठ्ठल विठ्ठल करणार

नाहीतर तुझा नामघोष ही आता मिटणार
बग स्वतःच्या अस्तित्वाचा तरी विचार कर न उत्तर कळव लवकरात लवकर मला….

🎧 कविता ऐकण्यासाठी इथे क्लिक करा: विठ्ठला तू ही थकला असता रे

कवी: शुभम ढमाले

🎙 कवितेचा आवाज: शुभम ढमाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *