(“विचार” ही कविता मनातील गोंधळलेल्या विचारांची कथा सांगते. भविष्याची चाहूल लागत असताना, अनिश्चित भावना आणि बुद्धी यांच्यातील संघर्ष यात दिसतो. कवयित्री पुनम लोखंडे यांनी या कवितेत अंतर्मनाचा आवाज मांडला आहे.)

वर्तमानाच काहुर नी ,
भविष्याची चाहूल भरवी विचारांची सभा.
न होता त्यास अध्यक्ष
नी न होता त्यास सचिव,
कुजबुजलेल्या व व्याकुळ अनिश्चित विचारांची होती सभा.

कोणत्या ओळी थांबू नी कोणत्या ओळीस हंबरडा फोडु,
कळे न आता मला.
अशी अनोळखी अवास्तव विचारांची ती सभा.!!

भावनांचा माईक कर्कश आवाज करीत,
पण का कुणास ठाऊक भिंती पाणी त्याचीही वायर कापली जाई.!!
मनोमनी चाले त्यांचा खंत,
मग बुद्धीएकदाच करी त्याचा निष्ठुर अंत.!!!!

कवयित्री : पुनम लष्करे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *