ती चाले निग्रहाने
तिच्या उद्दिष्टांची वाटं
मन हुंकारे आनंदे,
अवचित भेटता सुर्हृद।
त्याला होती उमगली
तीच्या स्वप्नांची भरारी,
जाई भारावून धेय्याने,
सर्हृदयी – समविचारी।
जाई विसरोनी श्रम
नसे थारा थकव्याला
काटे खडतर वाटेचे,
मउ लागती पायाला।
तप्त धरीत्रीला वाटे
जसा पाउस हवासा,
तीच्या एकाकी मनाला,
त्याच्या शब्दांचा दिलासा।
तीला येतसे प्रत्यय,
त्याच्या प्रगल्भ बुध्दीचा
मन मोकळे कराया,
भेटे माणुस हक्काचा!
वाटते नीत्य बोलावे
मनातले हितगुज,
तीला पाश संसाराचे
तो कर्तव्यात व्यस्त।।
वार्याच्या वेगे होतो,
त्यांच्या जाणिवेचा प्रवासं,
सांगा कसे जुळावे,
त्यांच्या भेटीचे गणितं?
त्यांच्या सालस मैत्रीला
लागे नजर कुणाची,
निमित्त दुराव्याला
घरच्यांची नाराजी।
लोकां कसे समजावे
दोन मनांचा व्यापार
गाणे परिपूर्ण व्हाया
लागे शब्द आणि स्वर।
वाटे झुगारून द्यावा
बंध समाज रुढींचा
कुणा ठाउक नसे का?
क्रृष्ण -सखा द्रौपदीचा।
त्यांच्या मैत्रीची महती
सारे जग असे गातं,
तीची लाज राखावया,
तोच धावे अविरत!
परी नाही उमगली,
समवेदानेची मैत्री,
जाई निघून आभाळ,
पुन्हा एकाकी धरीत्री।
मनातल्या प्रतिमेशी
आता बसते बोलत… .
जरी एकांगी संवाद,
होई बोलका एकांत ।।
कविता ऐकण्यासाठी इथे क्लिक करा: सखा
कवयित्री: स्वाती नामजोशी
कवितेचा आवाज: प्रगती जकाते