भारत – स्वर्णभुमी असलेला आपला देश. वीरांचा, कलावंतांचा, शेतकऱ्यांचा आणि एकेकाळी जगातील अर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या सर्वात श्रीमंत असलेला देश. एवढच नाही तर वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातही जगाच्या पुढे आहे. चला भारताच्या याच देदीप्यमान इतिहासाचा आणि वर्तमानाचा आढावा घेऊया .
इतिहास

पुरातन काळापासूनचे अनेक शोधग्रंथ आणि संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत . त्यात भारतीय संस्कृतीने जगाला सर्वच क्षेत्रातील ज्ञान देणारी प्रगत शास्त्रे तयार करून ठेवली आहेत.”भारतीय लोकांच्या ज्ञानाचा पारावर लावू शकणार नाही,” असे ब्रिटिश म्हणतात. अगदी शून्यापासून, अणू रेणू (atomic theory) पासून ते वैद्यकीय शास्त्र (आयुर्वेद) या सर्वात भारताने मोलाची कामगिरी करून ठेवली आहे . भौतिक, रासायनिक , वैद्यकीय , गणित इत्यादी क्षेत्रात सर्वाच्या मुळाशी आपली भारतीय संस्कृती आहे .
अभियांत्रिकी

अग्नीची पहिली चाचणी यशस्वी झाली आणि तेथील सर्व अभियंत्यांचे प्रयत्न फळाला आले. ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ यांच्या मार्गदर्शनाने ते सर्व अभियंते प्रभावी झाले होते . भारतात क्षेपणास्त्राचा तो पहिलाच प्रयोग होता. या भारतीय अभियंतांच्या टीमने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. डॉक्टर कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून सारे जग ओळखू लागले होते. क्षेपणास्त्र निर्मितीचा भारतातील हा यशस्वी प्रयत्न खरोखरच उल्लेखनीय ठरला. ‘परम’ संगणक जगातील सर्वात वेगवान कॉम्प्युटर या क्रांतीनंतर डॉक्टर विजय भटकर यांचे साऱ्या जगात कौतुक झाले. ‘परम’ चा शोध लागल्यानंतर, डॉ. विजय भटकर यांना अमेरिकेने ऑफर दिली. मात्र, ‘माझा शोध हा फक्त भारताच्या प्रगतीसाठीच कामी यावा,’ या विचाराने त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.
अवकाशात झेप

भारताच्या सेनादलाला बळकटी देणारी क्षेपणास्त्रे आणि ‘परम’ संगणकामुळे झालेली संगणक क्षेत्रातील क्रांती या गोष्टी विशेष लक्षवेधी ठरतात. अवकाश संशोधनामुळे होणारी प्रगती या सगळ्याच गोष्टींमुळे भारत हा एक महत्त्वाचा व वैज्ञानिकांच्या देश म्हणून ओळखला जातो. तसेच आत्ताचा काळात भारतात होणारे शोध, ‘ISRO’ ची प्रगती, जगातील सर्वात मोठी दुर्बीण ‘GMART’ , अनुक्षेत्रातील शोध, क्षेपणास्त्र निर्मितीतील प्रगती हे आणि किती किती उदाहरणे…… ही सर्व भारतातील ‘अभियांत्रिकीच्या’ प्रगतीची उदाहरणे. भारताने जगाला खूप प्रभावी, हुशार आणि कुशल अभियंते दिले. डॉ. अब्दुल कलाम , डॉ. विक्रम साराभाई, प्रा. विश्वनाथ कराड, डॉ, सी . व्ही . रामन अशी किती नाव….. असेच भारतात आणखी इंजिनियर्स तयार करण्यासाठी अनेक संस्था काम करत आहेत,IIT दिल्ली’, ‘IIT चेन्नई’, ‘ MIT-WPU’ पुणे’. भारताला तसेच जगाला पुढे नेण्यासाठी, वेगवान बनवण्यासाठी सर्वच अभियंते काम करत असतात. स्थापत्य (CIVIL) विद्युत (E and TC) इत्यादी सर्वात शाखा उत्तम आहेत.
स्थापत्य

अभियांत्रिकी, विज्ञान, संशोधन या सर्व गोष्टींचा भारताला प्राचीन वारसा लाभला आहे. आपल्याकडे स्थापत्यशास्त्र, जहाज बांधणी, विमान बांधणी याचे जुनी लेखे उपलब्ध आहेत. या अभियांत्रिकीच्या ज्या शाखा आहेत यांची मुळे भारतातच आहेत. हे जगाने मान्य केले आहे. जहाज बांधणी , विमान तयार करणे याची सुरुवात प्राचीन भारतात झाली. शिवकालातील किल्ल्यांची अभेद्य बांधणी, त्यांची रहस्यमय पाण्याची टाके तसेच भारतातील प्राचीन लेणी, गड किल्ले, मनोरे यांचा बांधकाम, रचना आजही अमेरिकेतील सिव्हिल इंजिनियर्सला ही हैराण करतात, कोड्यात पाडतात. ही बांधकामे चमत्कार नसून भारतीय लोकांच्या ज्ञान, कार्यक्षमता आणि निर्मितीक्षमतेचा उत्कृष्ट नमुना आहेत.त्यामुळे अभियांत्रिकीची मुळे भारतातच आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कितीतरी सुंदर स्थापत्यशास्त्राचे नमुने .त्यांची उत्तम आणि आत्ताच्या कुशल अभिनेत्यांकडून होणार नाही इतक्या मजबूत रचना आहेत.
कला
‘पहले जन्मी हैं जहा पे कला ….’ असे जेव्हा मनोज कुमार त्या गाण्यात म्हणतो तेव्हा उर भरून येतो. शिल्पकला, चित्रकला , नाट्यशास्त्र, दृकश्राव्य , सर्व क्षेत्रात भारतीयांचे नाव जगात घेतले जाते . आणि याचा जितका अभ्यास करू तितका थोडाच आहे . जगभरात जितके लेखक , नाटककार नसतील तितका लेखन आपल्या एका एका लेखकाने करून ठेवले आहे . ही जरा अतिशयोक्ती वाटेल परंतु प्रमाण जर पाहिलं तर हे वाक्य खोटं ठरणार नाही. अजून ही जगातील सर्वात श्रीमंत चित्रपट सृष्टीला जे साधलं नाही ते साधण्याची धमक भारतात आहे कारण , हे अमेरिकेने सुद्धा मान्य केले आहे की भारतीयांची कल्पनाशक्ती ही असामान्य आहे .
आधुनिक भारत

माझ्या अमेरिकन ‘ बंधू-भगिनींना…. हे शब्द ‘My American brothers and sisters ‘ स्वामी विवेकानंदा नंतर पुन्हा एकदा विश्व धर्म परिषदेत बोलले गेले. पुण्यातील एम.आय.टी. चे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे स्वामी विवेकानंदांनंतर विश्व धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव व्यक्ती आहेत. स्वामी विवेकानंदांनी ज्या मंचावर भारताचा संदेश दिला, त्याच मंचावर प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली तर भारत एक शक्तिशाली महासत्ता बनेल.
-प्रा. डॉ. विश्वनाथ कराड
भारत देश हा’NASA’ नंतर असलेला अवकाश संशोधनातील एक अग्रेसर देश.’ISRO’ ने अनेक प्रभावशाली अवकाश उड्डाणे केली. अमेरिकेने ही तोंडात बोट घालावं अशी कौतुकास्पद उड्डाणे, प्रभावशाली संशोधन ‘ISRO’ च्या नावावर आहेत. डॉक्टर साराभाई, अब्दुल कलाम आणि त्यांची साथ देणारे इंजिनियर्स यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या ‘ISRO’ ची ही ’80’ वर्षातील उल्लेखनीय प्रगती संपूर्ण जगासाठी कौतुकाची बाब तर भारतासाठी मान उंचावणारी गोष्ट आहे. अवकाश संशोधन, क्षेपणास्त्र निर्मिती आणि इतर संशोधने या क्षेत्रात भारत जगातील अग्रेसर देशांपैकी एक आहे.
आपले कर्तव्य
मला वाटते आपण भारतीयांना सर्वच क्षेत्रात वारसा लाभला आहे. परंतु तो वापरायचा कसा हे आपल्याला अजून समजले नाही. भारतीयांची कल्पनाशक्ती असामान्य आहे हे जगाने मान्य केले आहे. पण कधी कधी ही गोष्ट भारतीयांनाच ठाऊक नाहीये असं वाटतंय. आपण कोणाचे वारसदार आहोत, याचा अभिमान बाळगणे सोपे आहे. पण आपण त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेत आहोत का? याचाही विचार करायला हवा.जसे की, “आमचे पूर्वज हे राजे होते.” पण आम्ही मात्र नोकरी पत्करून त्यांच्या कर्तुत्वावर उड्या मारत आपला भविष्यकाळ संपवत आहोत हेच ध्यानी येत नाही .
या उलट, याच मनोवृत्तीचा फायदा पाश्चात्त्य देश घेत आहेत. आपली कल्पनाशक्ती, आपले कलागुण ते वापरत आहेत. भारतात व्यावसायिक तयार ना होतं, well paid employee तयार होत आहेत.आता जरा परिस्थिती वेगळी आहे पण, त्यात ही स्थैर्य नाही. एक वर्ष व्यवसाय करून आपल्याला लगेच श्रीमंत व्हायचं असतं. Western business पध्दती आपल्याकडे रूढ होत आहेत. ती पद्धत वाईट नाही, पश्चिमी व्यावसायिक पद्धती आपल्याकडे रुजू होत आहेत. त्या स्वतःमध्ये वाईट नाहीत, पण व्यावसायिकतेच्या नादात आपण आपल्यातील माणुसकी हरवत आहोत. पैसा आणि प्रगती ही काळाची गरज आहे, हे मान्य आहे. मात्र, लवकर यश मिळवण्याच्या घाईत आपण आपली संस्कृती आणि माणुसकी गमावत आहोत. आपण भारतीय आहोत. या देशातून एकेकाळी सोन्याचा धूर यायचा पण त्यात सोबत एक सुसंस्कृत मानवी सभ्यता ही होती. तीच जर गमावली तर भारताचे जे वेगळे अस्तित्व, वेगळी ओळख आहे ती राहणार नाही.
भारताला प्रगत देश बनविणे आणि त्यासोबत येथील संस्कृती, सन्मान जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
जय हिंद…!